नवदाम्पत्याला विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही, मंदिर समितीचा मोठा निर्णय..

पंढरपूर : पंढरपूर मंदिर प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील नवदांपत्यांसाठी मंदिरात आता थेट दर्शन मिळणार आहे. यामुळे आता रांगेत थांबायची गरज लागणार नाही. या निर्णयामुळे प्रशासनाचे आभार व्यक्त केले जात आहेत. आषाढी-एकादशीसह इतरही दिवशी पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
या गर्दीमुळे विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांना अनेक तास रांगेत तिष्ठत उभे राहावे लागते. आता नव्याने लग्न केलेल्या जोडप्यांना विठ्ठलाचे थेट दर्शन घेता येणार आहे. त्यांना कोणत्याही रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही. यामुळे अनेकांची वेळ वाचणार आहे.
नवीन लग्न झाले की नवदांपत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र विठुरायाच्या दर्शन रांगेत या नवदांपत्याला तासंतास तिष्ठत उभे राहावे लागते. यामुळे अनेकदा त्यांच्या वेळेचे नियोजन बिघडत आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
आता या नवीन जोडप्याला विठुरायाच्या दर्शनाला थांबावे लागणार नसून या नवदांपत्याला त्याच्यासोबत आलेल्या तीन लोकांसह थेट दर्शन दिले जाणार आहे. आज मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माघ यात्रेसाठी बैठकीत विकांना तशाच सुविधा दिल्या जाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. माघ यात्रा काळात ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार आहे, असेही ते म्हणाले.