उरुळीकांचन, दौंड व शिरुर मधील ७० हून अधिक स्थानिक पर्यटक उशीर झाल्यामुळे बचावले! पर्यटकांनी व्हिडीओ जारी केल्यामुळे थरारक घटनाक्रम झाला उघड…..

उरुळीकांचन : जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पेहलगावजवळ बायसरन गार्डन मध्ये मंगळवारी (दि.२२) रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्यात २७ देशवासियांचा बळी गेल्यानंतर या पर्यटन स्थळी दहा मिनिटांत पोहण्याचा तयारीत असलेल्या उरुळीकांचन तसेच दौंड व शिरुर मधील पर्यटकांचा जीव घटनास्थळी जाण्यास दहा मिनिटांचा वेळ लागण्यापूर्वी घटना घडल्याने ७० स्थानिक पर्यटकांचा जीव बारंबार वाचला आहे. उरुळीकांचन स्थित मेलडी टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून सुमारे ७० प्रवासी या पर्यटनस्थळी जाणारे होते त्यापूर्वीच घटना घडल्याने हेपर्यटक माघारी फिरले आहे. दरम्यान या पर्यटकांनी -हवेलीचेज्ञानेश्वर कटकेंशी संपर्क साधला असून कटके यांनी त्यांच्या परत वापसीसाठी विमानाची व्यवस्था करणार असल्याची माहिती दिली
आहे.
उरुळीकांचन येथील मेलेडी टूर्स व ट्रॅव्हल्सकडून आयोजित जम्मू कश्मीर च्या सहलीसाठी उरुळीकांचन, आळंदी म्हातोबा व परिसर तसेच दौंड व शिरुर तालुक्यातील एकूण ७० हे १५ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत . ते हल्ला झालेल्या घटनास्थळ असलेल्या बायसरन गार्डनला मंगळवारीच भेट देणार होते. परंतु ते घटनास्थळीवरुनअगदी एक किलोमीटर जवळील बायसरन पहाडीतून प्रवास करुन पर्यटनस्थळी पोहचण्यापूर्वीच दहा मिनिटांपूर्वी हाहल्लाझाल्याने ते बचावले आहेत. हे पर्यटन त्याच भेदरलेल्या अवस्थेत लष्कराने त्यांना पाठिमागे फिरण्याचा आदेश दिल्याने पाठीमागे फिरले आहेत. त्यानंतर त्यांनी पेहलगामध्येच एका हॉटेलमध्ये मिळेल त्या ठिकाणी संपूर्ण रात्र काढली असून सकाळी त्यातीलच एका पर्यटकाने व्हिडीओ स्वरुपात राज्य सरकारला मदत माघितल्यानंतर या अडकलेल्या प्रवाश्यांबद्दल माहिती प्राप्त झाली आहे.
या अडकलेल्या पर्यटकांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुनिल तटकरे यांच्याशी संपर्क साधून अडकलेल्या पर्यटकांना सोडविण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. या पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधण्याची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान या हल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आल्याने श्रीनगर भागातील वाहतुक ठप्प झाली आहे. त्यामुळे बुधवार सकाळी हे पर्यटक कश्मीर पर्यंत पोहचले आहेत. त्यांनी स्थानिक प्रशासनाशीमदतीची मागणी केली आहे.
” हवेली, दौंड व शिरुर मधील अडकलेल्या पर्यटकांशी संपर्क सुरू आहे. हे सर्व पर्यटक सुखरूप असून त्यांना कश्मीर अथवा जम्मू मार्गे परतीसाठी प्रयत्न सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार , खासदार सुनील तटकरे यांच्याशी संपूर्ण सुरू आहे लवकरच त्यांना विमानाने पुण्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये ‘
आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके
“दहशतवादी हल्यावेळी आम्ही बायसरन घाटातून प्रवास करुन हल्ला झालेल्या बायसरन गार्डनला जाणार होतो. परंतु या ठिकाणी जाण्यापूर्वी दहा मिनिटे पूर्वी घटना घडल्याने आम्हाला या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे आम्ही संपूर्ण रात्र पेहलगाम येथे काढली आहे. आम्ही सर्व ७० जण असून आम्ही मदतीची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासन आमच्या पर्यंत पोहचले असून मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.”
-ज्योती झुरंगे , मेलडी टूर्स अँन्ड ट्रॅव्हल , उरुळीकांचन