औषधे, गाड्या आजपासून काय स्वस्त काय महाग? जाणून घ्या…


पुणे : नवीन आर्थिक वर्षात अनेक बदल होत असतात. आता यामध्ये यावर्षी देखील अनेक बदल झाले आहेत. औषधे महाग झाली आहेत.

पेनकिलर, अँटी-इन्फेक्टीव्ह, अँटीबायोटिक्स आणि हृदयविकाराशी संबंधित औषधे महाग होणार आहेत.

त्याचबरोबर, सरकारने औषध कंपन्यांना किमती वाढवण्याची परवानगी दिली आहे. घाऊक किंमत निर्देशांक (WPI) मधील बदलांच्या आधारे किमती वाढणार आहेत. या औषधांच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.

एक एप्रिलपासून BS6-II कारची विक्री होणार आहे. त्यामुळे मारुती, होंडा, हुंडाई, टाटासह अनेक कंपन्यांनी वाहनाचे दर वाढवण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सने आपल्या कमर्शियल वाहनांच्या किंमतीत 5 टक्क्यांची वाढ केली आहे.

BS6 च्या फेस-2 एमिशन नॉर्म्समुळे वाहनांच्या किंमतीत 50 हजारांपर्यंतची वाढ होण्याचा अंदाज आहे. सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमाशुल्क 20 टक्क्यांवरून 25 टक्के, चांदीवर 7.5 टक्क्यांवरून 15 टक्के करण्यात आले आहे. यामुळे सोने आणि चांदीच्या किमती वाढू शकतात.

टोलच्या दरात किमान 7 टक्क्यांनी वाढ केली आहे. टोलचे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. देशभरातील महामार्गावर प्रवास करणे महाग होणार आहे. तसेच काही गोष्टी स्वस्त देखील होणार आहेत.

मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वाहने, टेलिव्हिजन संच, बॅटरी, कॅमेरा लेन्स कॅमेरा स्वस्त होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे बदल आजपासून लागू होणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!