Manoj Jarange : गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही, येणारच नाही!! मनोज जरांगे यांचा पक्का निर्धार…


Manoj Jarange वाघोली : अध्यादेश काढण्यासाठी सरकारला मुद्दत वाढ दिली. परंतु सरकार चालढकल करत आहे. कुणबी नोंदी मोठ्याप्रमाणात सापडल्या आहे. ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. गोळ्या झाडल्या तरी चालेले पण आरक्षण घेणारच असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी वाघोली येथे पाहटे ४.३० वाजता झालेल्या सभेमध्ये दिला आहे.

अंतरवली सराटी येथून मनोज जरांगे पाटील मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी निघाले असून पुणे-नगर महामार्गावर ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. दुपारपासूनच जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्यासंख्येने रात्री उशिरापर्यंत थांबले होते.

वाघोलीत पाटील यांचे आगमन होताच नागरिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर ते वाघोली येथील चोखीदानी रोडवरील सभा स्थळी पोहचले. भर थंडीतही लाखोंच्या संख्येने नागरिकांनी सभेला उपस्थिती लावली होती.

जरांगे पाटील यांनी व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सभेला सकाळी 4.३० वाजता सुरुवात केली. एवढा उशीर होऊन देखील मराठा बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. Manoj Jarange

गोळ्या घातल्यातरी आरक्षण मिळवून देणार..
गेली ७० वर्षांपासून मराठे आरक्षणाच्या हक्कापासून दूर राहिले आहेत. आता ही लढाई अंतिम असून गोळ्या घातल्या तरी इंचभरही मागे हटणार नाही. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. मराठा वादळ काय असते ते मुंबईत गेल्यावर कळेल. सरकारने चालढकल करू नये अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा पाटील यांनी दिला.

अजूनही प्रमाणपत्र दिले नाही..
कुणबी नोंदी मोठ्याप्रमाणावर सापडल्या आहेत. परंतु अद्यापही सरकाराने प्रमाणपत्र दिले नाही. एकाची नोंद आढळली तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आरक्षण मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. गेली ७० वर्षांपासून मराठा सोसत आहे. पुढच्या पिढीला तरी आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. आता सरकारला सुट्टी देणार नाही नसल्याचा इशारा देत प्रत्येक मराठ्यांनी मुंबईत दाखल व्हावे असे आवाहन पाटील यांनी केले.

मराठा पेटून उठला…
आता मराठा पेटून उठला आहे. केवळ आरक्षण हा आमचा अजेंडा आहे. केवळ महाराष्टातून नाही तर प्रत्येक राज्यातून मराठे जिवाजी बाजी लावण्यासाठी मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईत फक्त मराठेच दिसतील मग बघतो आरक्षण कसे मिळत नाही. आता मराठ्यांचा नाद करू नका नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा यावेळी पाटील यांनी दिला.

ओबीसी व मराठ्यात वाद घडवण्याचा प्रयत्न..
मराठा व ओबीसी असा वाद घडवण्याचा प्रयत्न केला गेल परंतु आम्ही तो डाव हाणून पडला त्यामुळे दोन्ही समाजामध्ये आजही सलोख्याचे वातावरण आहे. मी बोलत नव्हतो त्यांनीच आधी सुरुवात केली. मराठ्यांवर बोलण्याची त्याची लायकी नसल्याची टीका केली.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!