Manoj Jarange : …तर OBC आरक्षणच रद्द होईल!! मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये खळबळ, नेमकं झालं काय?

Manoj Jarange : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. मराठा आरक्षणाचबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे विरुद्ध ओबीसी नेते असा वाद आता टोकाला पोहचला आहे.
याबाबत ओबीसी नेते आणि जरांगे यांच्यात रोज टीका टिप्पणी केली जात आहे. अशात आता मनोज जरांगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधातच न्यायालयात याचिका दाखल करून ओबीसी आरक्षणच रद्द करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाला होणाऱ्या विरोधाला पाहता जरांगे यांनी हा इशारा दिला आहे. मनोज जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला ओबीसी बांधवांच्या लेकरांचे वाटोळ करायचे नाही. गोरगरिबांच्या मुलांच्या ताटात माती कालवायची नाही. मात्र, तो (छगन भुजबळ) जर आमच्या अन्नात माती कालवत असेल, तर तुमचे वाटोळे त्याच्यामुळे होत असल्याचे गाव खेड्यातील ओबीसी बांधवांनी समजून घ्यायला पाहिजे. Manoj Jarange
नाईलाजाने मला ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावे लागेल, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. कारण त्यांचा सुद्धा कोणताही अहवाल स्वीकारलेला नाही. आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास हे आणून द्यावा लागेल. त्यामुळे त्यांचा देखील देशातील संपूर्ण २७ टक्के आरक्षण रद्द होऊ शकते. हे फक्त त्याच्या एकट्यामुळे (छगन भुजबळ) एवढ्या लोकांचा वाटोळं होऊ शकतं, असे जरांगे म्हणाले. Manoj Jarange
पुढे ते म्हणाले, आमचे हक्काचा आरक्षण आहे. आमच्या कुणबी नोंदी सापडल्या आहे. त्यामुळे आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत. त्यामुळे आमच्या अन्नात त्याने माती कालवण्याचे प्रयत्न करू नये. गाव खेड्यातील ओबीसी बांधवांनी त्याला हे समजून सांगावे.
अन्यथा ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हालाही नाईलाजाने याचिका दाखल करून हे आरक्षण रद्द करावे लागणार आहे आणि ते रद्द देखील होणार असल्याचा, दावा जरांगे यांनी केला आहे. यामुळे आता पुढे अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.