Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर…, जरांगे पाटलांनी सांगितला प्लॅन


Manoj Jarange Patil : आम्हाला राजकारणात जायचं नाही हे मी वारंवार सांगत आहे. पण सरकारनं आम्हाला हालक्यात घेऊ नये. आम्ही जर कृती सुरु केली तर तुम्हाला आयुष्यातील सगळ्यात मोठा पश्चाताप होईल, असा इशारा मनोज जरांग पाटील यांनी दिला आहे.

आम्हाला जर आरक्षण देणारचं नसाल तर आमच्यासमोर पर्याय काय? मग आम्हाला आरक्षण देणाऱ्यांच्या जागेवरच जावं लागेल असंही जरांगे पाटील म्हणाले. आम्हाला आरक्षण दिले नाहीतर, आरक्षण देणाऱ्यांच्या जागेवर आम्हाला जावं लागेल असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते लातूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. Manoj Jarange Patil

आम्हाला राजकारणात जायचं नाही. पण वेळ आली तर मी राजकारण जाणार नाही, पण २८८ उभे करायचे की पाडायचे हे बैठक घेऊन समाज ठरवणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. पाच सहा समाजाचे लोक एकत्र येऊन लढाई लढू असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

ओबीसी नेते एकत्र आले तसे राजकारणाताली तगडे मराठा एकत्र येत नाहीत.आपल्या लेकराबाळांसाठी हे एकत्र येत नाहीत. ज्या मराठ्यांना आम्ही मोठं केलं ते आमच्यासोबत नाहीत याच दु:ख असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ज्यांना आम्ही मोठं केलं तेच आमच्या आन्नात माती कालवण्याचे काम करत असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!