Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट! म्हणाले, आंदोलनातील व्यक्तीला दिले १५ लाखांचे आमिष, तो व्यक्ती कोण?

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची नुकतीच बीडच्या नारायण गडावर बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी नारायण गडावर ८ जूनला भव्य सभा होणार असल्याची माहिती दिली आहे.
तसेच यावेळी त्यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल तर आपल्याला निवडणुकीचे काही देणेघेणे नाही, पण जर आरक्षण दिल नाही तर पुढील विधानसभा निवडणूक लढवणार, अशी घोषणा केली. अशातच जरांगे पाटलांचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील..
सध्या आंदोलनात सहभागी लोकांना फोडण्याचे काम सुरू आहे. एका व्यक्तीला १५ लाख रुपयांचे आमिष दिले जात आहे. असे असेल तर दोन तासात मराठे तब्बल ५ हजार कोटी रुपये जमा करतील. मराठा समाजाला आरक्षण द्या. आम्ही मागील दीड महिन्यांपासून वाट पाहतोय. तरी एसआयटी काही येईना. बीडमध्ये एसपी यांनी जेसीबीवर गुन्हा दाखल केले असून बीडचे एसपी कोतवालाचे काम करत आहेत, असा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. Manoj Jarange Patil
आमच्या गाडीला स्टीकर लावू नये…
माझे व्हिडिओ तयार करून मला बदनाम करू शकतात. मला खेटायचे असेल तर कायद्याने खेटा. कोणीही येणाऱ्या निवडणुकीत आमच्या गाडीला स्टीकर लावू नये. आणि तो कोणी लावूनही घेऊ नका. आपले वाईट झाले तरीही तुम्हाला राग चीड का येत नाही? सहा करोड मराठे तुम्ही काय कामाचे?, असा सवालही मनोज जरांगे यांनी विचारला आहे.
सरकारने आरक्षण दिले नाही, तर…
मी राज्यात एकही उमेदवार दिला नाही. लोक मनाने काहीही बोलत आहेत. कोणीही या आंदोलनाचा फायदा घेऊ नका. माझे फोटो कोणत्याही पक्षाने लावू नये. सरकारने आपली फसवणूक केली आहे. आपली एकही मागणी पूर्ण नाही. खोटे गुन्हे दाखल करणे थांबवा फडणवीस साहेब. २०० मीटरला पिण्याचे पाणी असेल.
साधारण ३ हजार एकरवर ही सभा असेल. सभास्थळी ४०० बेडचे सुसज्ज रुग्णालय. सरकारने आरक्षण दिले नाही तर पुढील विधानसभा निवडणूक ठोकलीच समजा. पाच-पाच हजार फॉर्म भरल्यावर तुम्हाला कोणते चिन्ह द्यायचे? मी एक अर्ज म्हटल्यावर सर्व जण कोमात गेले. एकही मराठ्याने कुठल्याही सभेला जाऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.