Jitendra Awhad : सलमान खान नंतर आता जितेंद्र आव्हाड यांना देखील बिष्णोई गँगची धमकी, लाखोंची मागणी करत….


Jitendra Awhad : बॉलीवूड अभिनेता सलामान खान याच्या घरावर नुकताच गोळीबार झाला होता. त्यानंतर मुंबई पोलीस तातडीने कामाला लागले. या प्रकरणाचा छडा लावला. त्याचवेळी या गोळीबार घटनेची जबाबदारी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिष्णोई गँगने घेतली.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली. त्यानंतरही बिष्णोई गँगने आपले उद्योग थांबवले नाहीत. या गँगने बॉलीवूडनंतर राजकीय लोकांना लक्ष केले आहे. आता आमदार जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगने टार्गेट केले आहे.

बिष्णोई गँगकडून आता बॉलीवूडनंतर राजकीय लोकांना लक्ष केले जात आहे. जितेंद्र आव्हाड देखील या गँगच्या रडारवर आले आहे. बिष्णोई गँगने त्यांना धमकी देत लाखो रुपयांची मागणी केली आहे.

आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आला असून धमकी देणाऱ्याने त्यांच्याकडे लाखो रुपयांची खंडणी मागितली आहे.जर पैसे दिले नाही तर सलमान खान सारखे होईल, असे म्हटले आहे. Jitendra Awhad

धमकी देणाऱ्याने आपले नाव रोहित गोदारा असे सांगितले आहे. आव्हाड यांना हा फोन ऑस्ट्रेलियातून आला आहे. दरम्यान या प्रकरणी लवकरच जितेंद्र आव्हाड पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे. पोलीस सलमान खान प्रकरणासारखे या प्रकरणातील आरोपींना शोधतील, अशी अपेक्षा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सलमान खानचे प्रकरण शांत होत नाही, तोच राजकीय नेत्यांना धमक्या या गँगकडून दिल्या जात आहेत. जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आला आहे.

धमकी देणाऱ्याने लाखो रुपयांची खंडणी मागितली आहे. पैसे न दिल्यास अन्यथा सलमान खान सारखे होणार असल्याचे म्हटले आहे. त्याने आपले नाव रोहित गोदारा म्हटले आहे. हा फोन ऑस्ट्रेलियातून आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!