गौतमीला तीन गाण्याला ३ लाख तर आम्हाला ५ हजार द्यायला नको म्हणतात ! निवृत्ती महाराजांनी थेट बोलूनच टाकले !!


 

आष्टी :  ‘गौतमी पाटील’ हिच्या लावणीची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मोठा मागणी आहे. कोणाच्या बायकोचा वाढदिवस असो की, गाई बैलाचा वाढदिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय होत नसल्याचे चित्र लावणी शौकिणांत आहे. आता गौतमीच्या लोकप्रियेतेची प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर
हे दखल न घेतलीच हेच घडलं असून महाराजांनी आता किर्तनकार पेक्षा नर्तनकारांना डिमांड वाढल्याचे बोलून
दाखविले आहे.

 

अहमदनगर जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन पार पडले आहे . यावेळी इंदुरीकर
महाजारांनी गौतमीचा उल्लेख टाळून “कीर्तनकारांनी 5 हजार रुपये मागितले तर काय खरं आहे त्यांचं, असं म्हणतात. पण तिकडे तीन लाखाला तीनच गाणी ऐकतात आणि 300 पोरांच्या चडड्या फाटतात. 200 पोरांचे गुडघे फुटतात. काय बोलयाचे म्हणून प्रश्न उपस्थित केला आहे.

 

महाराज म्हणतात की, आम्ही रस्त्यावर कीर्तन करतो. आमचं जीवन वाऱ्यावर. आम्हाला काय संरक्षण आहे? आम्हाला विमा नाही. जे जे लोक खरं काम करतात त्यांचा भोंग्या करायचा. तुम्ही बधिर आहे, म्हणून चाललंय सगळं. मी गेल्यावर कळेल तुम्हाला हा काय बोलत होता..’ असं इंदुरीकर महाराज यांनी म्हणून नाराजी व्यक्त केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!