बदला घेतल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही!! अजित पवारांनी पाकिस्तानला थेट इशाराच दिला…


पुणे : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना दहशतवादी हल्ल्यात जीव गमवावा लागला. या घटनेचा निषेध केला जात आहे. घटनेतील कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.

यावर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेईपर्यंत भारत गप्प बसणार नाही. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे सांगितले आहे. अजित पवार म्हणाले की, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.

अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक लोक पर्यटनासाठी तिथे गेले होते. या हल्ल्यात काही लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेचा बदला कधी घेतला जाईल याची संपूर्ण देश वाट पाहत आहे, टाइट फॉर टॅट असे उत्तर कधी दिले जाईल, या सर्व गोष्टींचा विचार केला जात आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत. स्वत: एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन तेथे उपस्थित आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत भारत गप्प बसणार नाही.

पुढे अजित पवार म्हणाले की, हा हल्ला इतका भयानक होता की संपूर्ण जगाने या घटनेची दखल घेतली आहे. निश्चितच, तुमच्या आणि आमच्या मनात आहे की या घटनेचा बदला घेतला पाहिजे आणि भारत बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही.

दरम्यान, २२ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगामजवळील एका पर्यटन केंद्रावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुतेक पर्यटक होते. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचाही समावेश आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!