रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! ३० एप्रिल पर्यंत ‘ही’ कागदपत्रे द्यावी लागणार, नाहीतर…


पुणे : रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रेशन कार्ड धारकांना आता अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. जे कार्ड धारक ही कागदपत्रे सादर करणार नाहीत त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे.

तसेच यामुळे सध्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू असून रेशन कार्डधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यभरात एक मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील रेशन कार्ड धारकांची तपासणी केली जाणार आहे. खरे तर अनेकजण मोफत रेशनसाठी अपात्र असतांनाही चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड बनवून धान्याचा लाभ घेत आहेत.

तसेच, राज्यात अनेक प्रकरणांमध्ये एकाच पत्त्यावर एकापेक्षा अधिक रेशनकार्ड असणे, मयत व्यक्तींची नावे रेशन कार्ड वर तशीच कायम असणे तसेच विदेशी नागरिकांकडे रेशनकार्ड असल्याचे प्रकरण समोर आले आहेत.

दरम्यान, अशाच अपात्र लोकांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने राज्यातील केशरी व पांढऱ्या रेशनकार्डधारकांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या तपासणी मोहिमेअंतर्गत ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त असेल आणि त्यांच्याकडे केशरी रेशनकार्ड असेल तर अशांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे. या संबंधित जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांचे केशरी रेशन कार्ड रद्द होईल आणि त्यांना नवीन पांढरे रेशन कार्ड जारी केले जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!