दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती, निकालाच्या तारखेबाबत मोठी बातमी समोर..


मुंबई : नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा संपन्न झाल्या आहेत. यामुळे आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षक दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

यंदा परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर लागण्याची शक्यता होती, त्यानुसार आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. १० वी-१२ वीच्या विद्यार्थांचा लवकरच निकाल लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्‍या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

निकालाच्या तारखांबाबत लवकरच मंडळाकडून घोषणा केली जाईल.यंदा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात बारावीच्या परीक्षा झाल्या. एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. राज्यातील ३ हजार ३७३ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली.

दरम्यान, दहावीची परीक्षा ही २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान घेण्यात आली. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी अडचण येऊ नये, त्यांना अतिरिक्त वेळ मिळावा मणून यंदा परीक्षा लवकर घेण्यात आल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!