Ajit Pawar : बारामती अडचणीत आणाल तर ठाण्यात संकट निर्माण करणार, अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याचा शिंदे सेनेला इशारा


Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने शिंदे गटाला इशारा दिला आहे. जर कोणी आमच्या स्वाभिमानावर हल्ले करत असतील आणि कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निकाल लागेल.

बारामती अडचणीत आणाल तर परिणाम कल्याणमध्ये होईल”, असा दमच अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे. त्यांनी शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांच्यासारख्या नेत्यांना आवर घालावा.

नाहीतर आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे खूप सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय लागेल, हे लक्षात ठेवा.”

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!