हिंदूंनो धर्म पाहूनच खरेदी करा! दुकानदाराला हनुमान चालीसा म्हणायला लावा, नितेश राणेंचं मोठं वक्तव्य..


मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे अनेकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. असे असताना मंत्री नितेश राणे यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. सध्या हा घटनेमुळे हिंदू मुस्लिम असा वादही वाचत चालला असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत आता नितेश राणे यांनी हिंदूंना आवाहन केले आहे की, दुकानदाराकडून सामान खरेदी करताना त्यांच्या धर्माची विचारणा करावी. दहशतवादी हल्लेखोरांनी मारण्याआधी धर्म विचारला, म्हणून आता हिंदूंनीही कोणत्याही दुकानदाराकडून खरेदी करताना त्यांच्या धर्माची चौकशी करावी. जर दुकानदार हिंदू असल्याचे सांगत असेल, तर त्याला हनुमान चालीसा म्हणायला लावा.

जर त्याला चालीसा म्हणता आली नाही, तर त्याच्याकडून खरेदी करू नका. असे आवाहन त्यांनी केले आहे. काही दुकानदार आपला धर्म लपवू शकतात किंवा खोटे बोलू शकतात. त्यामुळे खात्री करण्यासाठी त्यांना हनुमान चालीसा म्हणायला लावा. आता या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

दरम्यान, काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या करण्यापूर्वी त्यांचे नाव आणि धर्म विचारले. तसेच, काहींना ‘कलमा’ म्हणायला लावण्यात आले आणि जे म्हणू शकले नाहीत, त्यांची हत्या करण्यात आली, असेही सांगण्यात आले.

यामुळे क्रूर हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर देखील जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या विधानाचे समर्थन केले आहे, तर काहींनी त्यावर टीका केली आहे. यामुळे आता अनेकजण आक्रमक झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!