काळजी घ्या! तीन दिवसांत उष्माघातामुळे ७४ जणांचा मृत्यू, अनेकांना त्रास सुरू

लखनौ : यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊन असल्यामुळे अनेकांचे जीव गेले. राज्यात देखील काही ठिकाणी सभा होत्या, त्यामध्ये देखील अनेकांचा मृत्यू झाले. आकाशातून आग पसरणाऱ्या सूर्यप्रकाशाचा उद्रेक इतका भयानक झाला आहे की आता जनजीवन संकटात सापडले आहे.
कडक ऊन आणि उष्णतेच्या लाटेत बलिया जिल्हा रुग्णालयातील आकडेवारी भयावह आहे. गेल्या तीन दिवसांत उष्माघातामुळे ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंनी लोकांना हादरवून सोडले आहे.
उष्माघात टाळण्यासाठी डॉक्टर लोकांना उपाय सांगत आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे अचानक जुलाब, उष्माघात, अति ताप, श्वसनाचा त्रास अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय डॉ.दिवाकर सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, बलिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमान ४३-४४ अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. अतिसार आणि उष्माघाताच्या रुग्णांनी शासकीय व खासगी रुग्णालयांच्या खाटा तुडुंब भरल्या आहेत.
जिल्हा रूग्णालयात आपत्कालीन स्थितीत येणारे बहुतांश रुग्ण दगावत आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंत २५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे गुरुवारी सर्वाधिक (३१) मृत्यू झाले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.