सहावीच्या विद्यार्थ्यांनी भरविला आनंदी बाजार, बाजारातून मिळाले पन्नास हजारांचे उत्पन्न! उरुळीकांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम…!!


उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता सहावीच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, तुकडीतील विद्यार्थ्यांसाठी आनंदी बाजाराचे आयोजन आज शनिवारी (ता. २४) करण्यात आले होते.

या आनंदी बाजाराचे उदघाटन प्राचार्य भारत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले आहे. आनंदी बाजारामध्ये ४५ ते ५० हजारांची आर्थिक उलाढाल झाली असल्याची माहिती प्राचार्य भोसले यांनी दिली आहे.

शाळेतील विध्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, गणितीय संकल्पना लक्षात याव्यात यासाठी अनोखा अनुभव देण्याचा प्रयत्न या उपक्रमातुन करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची छोटी दुकाने शाळेच्या प्रांगणात थाटली होती. त्याला विद्यार्थी व शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वस्तू, भाजीपाला, फळे व खाऊच्या विक्रीतून व्यवसायाचा अनुभव घेतला आहे. ”भाजी घ्या भाजी…ताजी ताजी भाजी’ अश्या चिमुकल्यांच्या आरोळ्यांनी बाजारात रंगात आली होती. यामध्ये विदयार्थ्यांनी नूडल्स, भेळ, पाणीपुरी, वडापाव, प्लास्टिक भांड्याचे स्टेल, नर्सरीतील झाडे आदी घरउपोयोगी व शालेय वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी जवळपास वीस ते पंचवीस हजार रुपयाची कमाई केली आहे. आंनद बाजार यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य गोविंद जाधव, प्रतिभा हरिभक्त, सुशीला कुंजीर, भावना नाटे, किशोर येवलेकर, अजय पाटील, आबासाहेब सायकर, आदी शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी प्रयत्न केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!