पुणेकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी! गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या अतिमहत्वाच्या उड्डाणपुलाचे काम होणार सुरू…


पुणे : पुण्यातील गंगाधाम चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचा मुद्दा गेल्या तीन वर्षांपासून रखडला होता. हा पूल कसा असावा, पूर्व-पश्चिम की उत्तर-दक्षिण, यावर एकमत होत नव्हते. असे असताना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता अखेर वाहतूक पोलिसांच्या मदतीने या समस्येचे निराकरण झाले आहे.

याबाबत पूल पूर्व-पश्चिम बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचसोबत मार्केट यार्ड येथून कात्रज-कोंढवा रस्त्याकडे जाण्यासाठी एक भुयारी मार्ग तयार करण्याचेही ठरले आहे. यामुळे यावर अखेर तोडगा निघाला आहे. पुण्याच्या पश्चिम भागात गंगाधाम चौक हा वाहतूक कोंडीचे प्रमुख ठिकाण बनले आहे.

याठिकाणी असलेल्या मार्केट यार्डामुळे या मार्गावर कायम जड वाहनांची वाहतूक दिसून येते. कात्रज-कोंढवा रस्त्यावरून मार्केट यार्डमध्ये ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे हा चौक अधिकाधिक कोंडी होण्याचा धोका होता. यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात होती.

या परिसरात सुमारे दीड हजार सदनिकांची गृहनिर्माण योजना आणि दोन हजार व्यावसायिक गाळ्यांचे खासगी होलसेल मार्केट उभारले जात आहे. त्यामुळे वाहतुकीची स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून प्रशासनाने चार वर्षांपूर्वी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, पुणे शहर हे अतिशय वेगाने विकसित होणारे शहर आहे. या ठिकाणी अनेक पायाभूत सुविधांची कामे सुरू असून अनेक कामे हे प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक रस्ते प्रकल्प तसेच उड्डाणपुलाचा समावेश आपल्याला करता येईल. यामुळे येणाऱ्या काळात शहर बदलणार आहे.

उड्डाणपुलाच्या बाबतीत बघितले तर गंगाधाम चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचा मुद्दा गेल्या तीन वर्षांपासून रखडला होता. दरम्यान, या निर्णयामुळे पुलाचे काम लवकरच सुरू होईल. प्राथमिकतेने उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले जाईल, आणि त्यानंतर भुयारी मार्गाचे काम हाती घेतले जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!