ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणे, हेच गावचे भविष्य आहे – ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे


लोणी काळभोर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणे, हेच गावचे भविष्य आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणे हे लोकप्रतिनिधी या नात्याने आमचे कर्तव्य आहे, त्या गरजा पूर्ण करण्याचा सर्वोतपरी प्रयत्न, आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मिळून करू असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांनी सांगितले आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्यासाठी आयुष सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हवेली तालुक्यातील थेऊर येथील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना, वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच थेऊर मधील अंगणवाडी विद्यार्थ्यांना, पैशाच्या बचतीची सवय लागावी म्हणून, गल्ल्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काकडे बोलत होते.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पाठबळ देण्याचा उद्देश ठेवून करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधे शैक्षणिक उत्साह वाढला आहे. पालकवर्गाने या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे, माजी उपसरपंच भरत कुंजीर, नवनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष नवनाथ कुंजीर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय तांबे, रामचंद्र बोडके, मयुर कुंजीर, गोरख काळे, आनंद वैराट, सोमनाथ खंडागळे, गणेश चव्हाण, नाना शेडगे, मेहब्बुब सय्यद, रामदास चव्हाण, कैलास सावंत, अजय जाधव, सचिन चव्हाण, रामदास भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!