Eknath Shinde : माझ्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत….!! मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य…


Eknath Shinde : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी ४० दिवसांचा अवधी दिला होता. या अल्टिमेटमचा कालचा शेवटचा दिवस होता. दिवसभर सरकारकडून मनोज जरांगे पाटलांना कोणतंही निवेदन देण्यात आलं नाही. Eknath Shinde

त्यामुळे सर्वांच्या नजरा या दसरा मेळाव्याकडे होत्या. कारण की, दसरा मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे याबाबत काहीतरी बोलतील यामुळे सर्वांचे लक्ष याकडे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणाचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला.

शिंदे म्हणाले की, मी देखील एका सर्वसामान्य कुटुंबाततील असून मला त्यांचे दुःख वेदना कळतात. मला त्यांची जाणीव आहे. जस्टिस शिंदे यांची याबाबत काम करत असून ही समिती २४ बाय ७ काम करते.

त्यामुळे याबाबत पुनर्विचार याचिका देखील दाखल झाली आहे. त्यामुळे कोणाचेही आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला टिकणार आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार, असे शिंदे म्हणाले आहेत.

त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी मी लढणार इतर कोणावरही अन्याय न करता आरक्षण देखील देणार. कारण हे सगळे आपलेच आहेत असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने, शपथ घेऊन, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सांगतो. मी मराठा समाजाला आरक्षण देणार, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत आज संपली आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!