Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांचे मोठं वक्तव्य, म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना घाम फोडतो!! … तर माझेच १०० आमदार असते


Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे.

अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार आणि प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. सटाणा येथील प्रचारसभेत बोलताना बच्चू कडू मुख्यमंत्र्याला घाम फोडून टाकतो, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

तसेच मी जर जातीचे राजकारण केले असते तर माझेच १०० आमदार निवडून आणले असते. परंतु मी शेतकरीच राजकारण करतो, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

बच्चू कडू म्हणाले, आताची राजकीय अवस्था अशी आहे की कुठल्याही पक्षाची सत्ता येणार नाही. माझ्या विरोधात काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिला आहे. परंतु आता आमचे शिवाय सरकार बनणार नाही. आमचा पक्ष लहान असला तरी काम त्या मोठ्या पक्षांपेक्षा मोठे आहे.

बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना उद्देशून बच्चू कडू म्हणाले, येथे धमक्या दिल्या जातात. परंतु त्यांना माहीत नाही, आमच्या पक्षाचे नावच प्रहार आहे. त्यामुळे किमान धमक्या देऊ नका. खरं पाहिलं तर शेतकरी संकटात आहे. देशात सर्वात जास्त आत्महत्या शेतकरी आणि तरुण करत आहेत.

स्वामिनाथन आयोग आम्ही स्वीकारला तेव्हा शरद पवार कृषिमंत्री होते. तेव्हापासून आतापर्यंत मोदींनी देखील शेतकऱ्यांच्या शेत पिकाला भाव दिला नाही. कुणीही हमीभाव दिला नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्यात बंदी केली गेली होती.

कांद्याविषयी कोणीही लोकसभेत बोलले नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादकांनी दणका दिला आणि भाजपचा खासदार पडला. आताही कांद्याला भाव नाही तर मत नाही अशी पाटी घरावर लावा. असे ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!