उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावीचा १०० टक्के निकाल..

उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उरुळी कांचनसह परिसरातून कौतुकांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उरुळी कांचन येथील अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती संचालक डॉ. अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली. तसेच महाविद्यालयातून एकूण ४७६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ४७६ पैकी ४७६ विद्यार्थी पास झाले आहेत.
प्रथम पाच आलेले विद्यालयातील विद्यार्थी..
मृणाल राहुल जाधव ९१.५०, टक्के.
कार्तिक अशोक गुप्ता ९१.०० टक्के.
पूर्वा विशाल थोरात ८८ टक्के.
श्रावणी सखाराम काळे ८७. ३३ टक्के.
जान्हवी प्रदीप कडुकर ८६.६७ टक्के.
Views:
[jp_post_view]