दुहेरी संकट! राज्यात काही भागांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर ‘या’ भागात गारपीट होणार…


पुणे : सध्या महाराष्ट्रात वातावरणात मोठे बदल होत आहेत. एकीकडे तापमानात लक्षणीय वाढ होत असताना, दुसरीकडे काही भागात गारपीट व अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यातील अनेक भागात उष्ण आणि दमट हवामान राहणार असून, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि नांदेड भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगर भागांमध्येही हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या सर्वत्र तीव्र उन्हाचा अनुभव घेतला जात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे. विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांमध्ये २७ एप्रिलला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर इतर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना २८ एप्रिलसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागानुसार विदर्भात २७ आणि २८ एप्रिलला गारपीट होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून तापमान ४४ अंश सेल्सियसच्या आसपास आहे. चंद्रपूरमध्ये ४५.४ अंश आणि अकोल्यात ४५.१ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. या काळात ढगाळ वातावरण राहिल्यामुळे नागपूरच्या तापमानात १ ते २ अंशांची घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्याच्या इतर भागांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा व द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!