तेलंगणा ‘शेतकरी मॉडेल’ च्या व्यवस्थेची चर्चा सुरू! चंद्रशेखर राव यांच्या शेतकरी हिताच्या भूमिकेचे शेतकऱ्यांत आकर्षक..!!


जयदीप जाधव

उरुळीकांचन : ‘अब कि बार किसान की सरकार’ हा हॅशटॅग वापरुन पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जाहिरात बाजी करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर परिवर्तनाची भाषा बोलणारे भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या शेतकरी ध्येय धोरणांची चर्चा आता खेडोपाडी रंगू लागली असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या केसी राव यांनी उभे केलेले तेलंगणा राज्यात शेतकरी मॉडेल व त्यांच्या पक्षाची शेतकरी अस्मितेची भूमिका आता शेतकरी आवर्जून पाहू लागला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ च्या लोकसभा निवडणुकी पूर्वी गुजरात विकास मॉडेलचे रुप देशवासीयांना सत्ता परिवर्तन करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शेतकरी मुद्दा केंद्रमुख करीत ‘अब कि बार किसान सरकार’ म्हणून त्यांच्या पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरात परिवर्तनाचा नारा दिला आहे.

शेतकरी आवस्थेवर चंद्रशेखर राव यांनी बोट ठेऊन महाराष्ट्र राज्यात पक्षाचे पाय जमविण्यासाठी प्रयत्न सुरू केला असला तरी त्यांनी शेतकरी मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केल्याने या मुद्द्याभोवती शेतकऱ्यांच्या विशेष नजरा लागून राहिल्या आहेत. प्रथमच संपूर्ण देशात एखादा पक्ष राष्ट्रीय अस्मिता, संरक्षण अथवा राष्ट्रीय मुद्दावर न बोलता थेट शेतकरी मुद्द्यावर बोलू लागल्याने पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आपल्या विवंचनेवर बोलणारा पक्ष म्हणून लोकांसमोर येऊ लागल्याने शेतकऱ्यांत या घोषणेचे व भूमिकेचे मोठे स्वागत आहे.

स्वातंत्र्यानंतर देशाच्या अन्नधान्य

उत्पादन क्षेत्रात मोठा घटक असलेल्या शेतकरी प्रश्नावर कुठलाच राजकीय पक्ष न बोलण्याने के.सी.राव यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गेली दोन दशकांपासून वाढती महागाई व शेतकरी उत्पादनाला हमीभाव मिळत नसल्याने निर्माण होत असलेल्या तफावातून शेतकरी अर्थिक तोट्यात जाऊ लागला आहे. या आवस्थेची सोडवणूक करण्यास समर्पक प्रयत्न होत नसल्याने शेतकऱ्यांची आवस्था दोलायमान झाली आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या नैराश्यातून आत्महत्या व कर्जबाजारीपणा वाढत चालला आहे.

शेतीतून उत्पन्न मिळून कुटूंबाचा रेटा चालविता येईल अशी वैफल्यग्रस्त आवस्था शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे. शेतीतून अर्थिक तोट्याचे समीकरणे शेतकऱ्यांना उद्वस्त करु लागल्याने शेतकरी आता पूर्णपणे सरकारच्या ध्येयधोरणांवर विसंबून राहू लागला आहे.परंतु शेतकऱ्यांबद्दल सहानभूतीचे शब्द सोडाच, पण दिलेल्या अश्वासनांची होळी राज्यकर्त्यांकडून सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सहानुभूतीने विचार करणे गरजेचे बनले आहे.

सरकारी धोरणांपासून ते अगदी नैसर्गिक आपत्ती, फसवणूक पर्यंत शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळत नसल्याने बळीराजा हा पूर्णपणे दुसऱ्या घटकावर विसंबून राहत आहे. उत्पादीत केलेले पिक ते बाजारपेठेपर्यंत ही व्यवस्था शेतकरी शास्वत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना माल उत्पादीत करताना बियाणे, मशागत ,वीज, मजूरी, तोडणी हा भरमसाठ खर्च करुन शेतमाल उत्पादीत करण्यासाठी प्रयत्न करावे लागत असल्याने शेतकऱ्यांचा मालाला योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने पारंपारीक शेतीसह आधुनिक शेतीच्या धोरणांत बदल करणे गरजेचे बनले आहे.

तात्पुरती कर्जमाफीची मल्लपट्टी करुन शेतकऱ्यांचा उध्दार करणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र सत्तेच्या खेळात निवडणूकीच्या अश्वासनां च्या कृतीपलिकडे शेतकऱ्यांच्या जखमेवर इलाज होत नसल्याने शेतकरी शेतकरी अश्वासन निर्णयांकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे वीज, रासायनिक खते, बाजारपेठेचे पोषक वातावरण या निर्णयांची प्रतिक्षा शेतकरी करीत आहे.

देशातील अनेक राज्यांत शेतकऱ्यांना मोफत वीज,औषधे -खतांत सबशिडी,पिक कर्जाची उपलब्धता, सिंचनाची कार्यवाही , कृषी अवजारांची उपलब्धता आदी निर्णय घेतले आहेत. असेच निर्णय आपल्याकडे घेता येईल का म्हणून विचारविनिमय होणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी प्रश्नावरुन जाहिरात करणाऱ्या चंद्रशेखर राव यांच्या भूमिकेचे शेतकऱ्यांत मोठे कुतुहल आहे. मात्र चंद्रशेखर राव यांनी संपूर्ण देशाच्या विकासाच्या अजेंड्यावर शेतकरी प्रश्न घेतल्याने त्यांच्या भूमिकेचे शेतकऱ्यांत समाधान होत आहे हे नक्की.

Views:

[jp_post_view]

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!