चीनचा पाकिस्तानला धक्का!! आधी मिसाईल विकले, आता ऐन युद्धाच्या क्षणी कोलांटउडी, भारतासाठी गूड न्यूज..

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची तीव्रता वाढतच चालली आहे. या संघर्षाची धग वाढत असताना आता चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यावेळी दोन्ही देशात संघर्षाची ठिणगी पडली, तेव्हा चीन पाकिस्तानची बाजू घेईल असं म्हटलं जात होतं. मात्र चीनने ऐनवेळी कोलांटउडी मारली आहे.
यामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. आता चीनने तटस्थ भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. ही भारतासाठी गूड न्यूज समजली जात आहे. कारण चीन पाकिस्तानच्या मदतीला उतरला असता तर भारतासमोरील आव्हान आणखी वाढलं असतं. पण तसं झालं नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन काढत दोन्ही देशांना शांततेचं आवाहन केलं आहे.
आम्ही भारत आणि पाकिस्तान दोघांनाही शांतता आणि स्थैर्याला प्राधान्य देण्याचे, शांत आणि संयमी राहण्याचे, शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवण्याचे आणि दोन्ही देशात तणाव वाढेल, अशी कृती टाळण्याचे आवाहन करतो, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, पाकिस्तान सतत कारवाया करत आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा अंधारात पाकिस्तानने भारतातील २६ ठिकाणांवर ड्रोन हल्ले केले. यानंतर भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे हे सर्व हल्ले हाणून पाडले. दरम्यान, पाकिस्तानने आता थेट भारताची राजधानी दिल्लीवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला.
असे असताना भारतीय सैन्यांनी हा पाकिस्तानचा इरादा हाणून पाडला. सध्या भारत आणि पाकिस्तानला तणाव वाढू नये, यावर चीनने भर दिला आहे. पाकने रात्री अनेक सशस्त्र ड्रोन पाठवले. ज्यामुळे नागरिक आणि धार्मिक स्थळांना धोका निर्माण झाला. मात्र भारतीय जवानांनी चोख उत्तर दिले आहे.