कवडीपाट ते कासुर्डी दरम्यान अतिक्रमणांवरील कारवाई बसणात ! एनएचएआयची डोळेझाक वाहतुक कोंडीस कारणीभूत ..!!


उरुळीकांचन : पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळीकांचन हद्दीत वाहतुक कोंडीचा प्रचंड मनस्ताप वाहनचालक व स्थानिकांना दिवसेंदिवस पडू लागला आहे. सण असो की नसो या ठिकाणी वाहतुककोंडी नित्याचीच बाब होऊ लागल्याने या जटील समस्येने नागरीक आता पुरते हौराण होऊ लागले आहे. काही क्षणांचा या ठिकाणचा प्रवास तासोंचा होऊ लागल्याने नागरीकांना या प्रश्नाने हतबल करुन ठेवले आहे. या वाहतुक कोंडीच्या मुख्य समस्येचे कारण असलेल्या अरुंद रस्ते व अतिक्रमणांवर कारवाईच होत, नसल्याने वर्षभरापूर्वी कवडीपाट ते कासुर्डी दरम्यान अतिक्रमने हटावची मोहिम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बसणात बांधली काय ? असा जळजळीत सवाल नागरीक उपस्थित करु लागले आहे.

 

पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळीकांचन हद्दीतील वाहतुककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होऊ लागला आहे. या ठिकाणी वाहतुक कोंडीचा प्रस्न नित्याचीच बाब ठरू लागला आहे.या ठिकाण प्रवास करताना सकाळी या, संध्याकाळी या, आम्ही तुमचे स्वागत वाहतुक कोंडीनेच करु अशा प्रकारची आवस्था रस्त्याचा श्वासच कोंडल्याने होऊ लागली आहे. तीच कोंडी पण प्रवाश्यांना मात्र दिलासाच नाही, असा काही अनुभव काही वर्षापासून नागरीकांना मिळत असल्याने सुस्त झालेले स्थानिक प्रशासन ,लोकप्रतिनिधी ,पोलिस यंत्रणा तात्पुरता मार्ग काढण्यातही स्वारस्यच दाखवित नसल्याने या जटील समस्येला सोडविण्यास कोण वाली आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट ते कासुर्डी दरम्यान २००३ साली चौपदरीकरण झाल्यानंतर वीस वर्षाचा कालावधी उलटूनही महामार्गाच्या डागडुजी पलिकडे फार काही लक्ष देण्यास प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याने या महामार्गावर नवीन समस्या उत्पन्न होऊ लागल्या आहेत. मागील वीस वर्षाच्या कालावधीत रस्त्याच्या वाहतूकीत झालेली प्रचंड वाढ मात्र रस्त्याच्या रुंदीकरणाचा अथवा रस्त्याच्या वाहतुकीला सुरळीत होईल असा एकही उपाय होऊ न शकल्याने वाहतुकीचा मोठा बोजवारा या ठिकाणी उडाला आहे. कवडीपाट ते कासुर्डी दरम्यान महामार्गावरची टोल वसुलीची मुदत २०१९ साली संपल्यानंतर महामार्गाच्या दुरुस्ती व देखभालाची मोठी उणीव या ठिकाणी निर्माण झाली आहे. चार वर्षाचा कालावधी उलटूनही राष्ट्रीय महामार्गाच्या साजेसा रस्ता तयार करण्यात चालढकलपणा झाला आहे. या महामार्गाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असताना महामार्ग दुरस्तीसाठी एजन्सीची नेमणूक नसल्याची भयानक आवस्था आहे. सातत्याने या ठिकाणी रस्ते अपघात बळी जाताना तात्पुरती मलपट्टी करणे इतकीच काय जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधि करणाची आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

अतिक्रमणांवरील कारवाई बोलाची कडी बोलाचा भात कवडीपाट ते कासुर्डी महामार्ग आवस्थेवर वृत्तपत्रांत बातम्यांचा भडीमार झाल्याने निद्रेत असलेले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे झोपेतून जागे झाले, या भागात महामार्गाची भयानक आवस्थेची त्यांना उपरती आली. त्यानंतर मात्र त्यांनी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी वृत्तपत्रात जाहीरात देऊन महामार्गावरील १५मीटर अतिक्रमण हटविणार असल्याची घोषणा केली. काही भागांत या कारवाईचा धसका घेऊन प्रतिसाद मिळाला मात्र वर्षभराचा कालावधी उलटून अतिक्रमणे पुन्हा एकवटल्याने प्राधिकरणाची कारवाई “बोलाची कडी बोलाचा भात ठरली आहे”.

 

  अतिक्रमणांवर लवकरच नव्याने कारवाई 

” कवडीपाट ते कासुर्डी दरम्यान वर्षभरापूर्वी सुरू केलेली अतिक्रमणांवरील कारवाई पुन्हा नव्याने सुरू करण्यात येणार आहे प्राधिकरणाकडे काही अतिरीक्त कामे असल्याने ही कारवाई पुढे जाऊ शकली नाही. या दरम्यानच्या महामार्गावर नव्याने कारवाई करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून आवश्यक ठिकाणी पोलिस बळ घेऊन कारवाई होणार आहे” .

-किरण जगताप , सहाय्यक अभियंता स्थापत्य विभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!