Akshay Shinde Encounter : गोळी डोक्यात का मारली? हा एन्काउंटर होऊच शकत नाही, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पटत नाहीत, अक्षय शिंदे प्रकरणी कोर्टाने सरकारला फटकारले…


Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले.

पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांनी हायकोर्टात धाव घेत याप्रकरणी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी नुकतीच पार पडली. या सुनावणीवेळी हायकोर्टाने सरकारसह पोलिसांनाही खडे बोल सुनावले.

मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी होत आहे. यावेळी सरकारी वकील हितेन वेणूगावकर यांनी कोर्टात सरकारची बाजू मांडली.

याप्रकरणाचा तपास राज्य सीआयडीकडे दिला आहे. त्यांची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. यावर कोर्टाने सीआयडीचा तपास कधी पूर्ण होणार याची माहिती द्या, असे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहे. तसेच यावेळी आरोपीच्या बाजूने वकील अमित कटारनवरे हे बाजू मांडत आहेत. Akshay Shinde Encounter

आरोपीच्या वकिलाने अक्षयची हत्या करण्यात आल्याचा दावा केला आहे. अक्षय पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जाऊ शकत नव्हता. त्याची तशी शारीरिक क्षमताही नव्हती. केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही हत्या करण्यात आली आहे, असा दावा आरोपीचे वकील अमित कटारनवरे यांनी केला आहे. हा फेक एन्काऊंटर असल्याने कोर्टाने त्यात लक्ष घालून चौकशी करावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथक दाखल करावे, अशी मागणीही आरोपीच्या वकिलाने केली आहे.

ही गोळी कुठून चालली? किती लांबून गोळी चालली?

आरोपीच्या डोक्यात गोळी का मारली? पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर? सामान्य माणूस बंदूक चालवू शकतो का? याला एन्काऊंटर म्हणू शकत नाही, एन्काऊंटरची व्याख्या वेगळी आहे? आरोपीला काबू करायला हवे होते, आरोपीला गोळी का मारली? तीन गोळ्या मारल्या, एक लागली तर दोन गोळ्या कुठे गेल्या? चार पोलीस एका आरोपीला काबू करु शकत नव्हते का? पिस्तूल की रिव्हॉल्व्हरमधून गोळी मारली? फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असती तर पावले उचलावी लागतील? आरोपीने पिस्तूलचे लॉक ओपन करुन राऊंड फायर केले का? पोलीस अधिकारी जखमी झाले त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मानवाधिकार आयोगाकडे सादर करा? घटनेशी संबंधित पोलीस अधिकारी कोर्टात आहेत का? असे प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारले आहे.

दरम्यान, बदलापूर प्रकरणात काही आरोपी आहेत. त्यांना पॉक्सो लावण्यात आला आहे. या आरोपींना वाचवण्यासाठीच अंकुश शिंदेला मारलं गेलं, असा आरोपही याचिकाकर्त्याच्या वकिलाने केला आहे. दरम्यान, कोर्टाने या एन्काऊंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागितला आहे. गोळी कुठून चालली? किती लांबून गोळी मारली गेली याची माहिती देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तसेच कोर्टाने अनेक मुद्दयांवरून सरकारी वकिलांना धारेवरही धरले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!