पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिला धक्का!! घेतला सर्वात मोठा निर्णय..

जम्मू काश्मीर : येथील पहलगाम खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची नाकाबंदी करण्यासाठी अनेक पाऊले उचलली आहेत. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भारताने पाकिस्तानी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या खात्यावर भारतात बंदी घातली आहे. पाकिस्तानसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
भारताने पाकिस्तानविरुद्ध डिजिटल स्ट्राइक सुरू केला आहे. सीसीएस बैठकीत भारताने यापूर्वी पाच मोठे निर्णय घेतले होते. यामध्ये अटारी सीमा बंद करणे देखील समाविष्ट होते. आता भारताने सोशल मीडियाबाबत मोठी कारवाई केली आहे. देशाच्या आयटी मंत्रालयाने एक्स कंपनीला भारतातील पाकिस्तान सरकारचे खाते ब्लॉक करण्यास सांगितले होते.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा गोळ्या घालून मृत्यू झाला. ज्यामध्ये २५ भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा समावेश आहे. या घटनेवर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध अधिक कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे.
यामध्ये पाकिस्तानशी असलेले सर्व राजनैतिक संबंध संपवणे, भारतातील पाकिस्तानच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर बंदी घालणे आणि इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालय बंद करणे यांचा समावेश असू शकतो. यामुळे पाकिस्तानला त्याच्या दहशतवादी कारवायांविरुद्ध ठोस पावले उचलण्यास भाग पाडता येईल. यामुळे भारताने याबाबत तयारी केली आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेरील पोलिस सुरक्षा काढून टाकण्यात आली. पहलगाम हल्ल्यानंतर दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. मात्र, गुरुवारी दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेरील सर्व बॅरिकेड्स हटवले आहेत.