मोठी बातमी! भाविकांनी भरलेली ट्रॉली तलावात पडली, १५ जणांचा बुडून मृत्यू..


उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कासगंज जिह्यात एक मोठा रस्ता अपघात झाल्यामुळे आतापर्यंत १५ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पटियाली-दरियावगंज रस्त्यावर भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली नियंत्रणाबाहेर जाऊन तलावात पडली आहे. तलावात गेल्याने ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. ज्यात बहुसंख्य भाविक समाधिस्थ झाले. या अपघातात आतापर्यंत १५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये आठ महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. अनेक गंभीर जखमी भाविकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना रेफर करण्यात आले आहे. घटनास्थळापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत गोंधळाचे वातावरण आहे.

डीएम, एसपी आणि इतर प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील अनेकांचा समावेश आहे. प्रशासनाने आतापर्यंत १५ जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, सीएमओ डॉ. राजीव अग्रवाल यांनी सांगितले की, पटियालीच्या सीएचसीमध्ये सात मुले आणि आठ महिलांना मृत घोषित करण्यात आले आहे. रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात आणलेल्या इतर जखमींच्या चाचण्या सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. परिस्थिती अधिक गंभीर आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!