हवेलीत दोन महिन्यांत विक्रमी ६५ हजार ३०० दाखले वितरीत…

उरुळी कांचन : हवेली तहसील कार्यालयाने नियुक्त केलेल्या पथकाद्वारे तालुक्यात दोन महिन्यांत तब्बल तब्बल ६५ हजार ३०० दाखले वेळेवर वितरीत करण्याची किमला पेलली आहे.
तहसिल अंतर्गत महाविद्यालयीन प्रवेशासह शालेय स्तरावरील दाखल्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी उचलल्या या पाऊलांनी शहरालगत सर्व विद्यार्थी विनाविलंब ऑनलाईन दाखले मिळण्यासाठी मदत झाल्याने हवेलीत नागरीकांना गतिमान प्रशासन काराभाराचा प्रत्यय आला आहे.
जून व जुलै महिन्यात महाविद्यालयीन स्तरावर प्रवेक्षासाठी उत्पन्न व जातीचे दाखल जमा करणे अनिवार्य असल्याने पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात लोकसंख्येने सर्वात मोठा तालुका असलेल्या हवेली तालुक्यात दाखला मिळण्यासाठी पालक व विद्यार्थी हे प्रयत्न करीत असतात.
हवेली तालुक्यातील दाखल्यां ची मागणीची संख्या अधिक असल्याने ऑनलाईन दाखले देताना सर्व्हर डाऊन राहणे त्रांत्रिक बिघाड होणे यांसारखे प्रकार होत असल्याने प्रवेशाच्या वेळी दाखले मिळत नसल्याची आवस्था होती. मात्र हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी दाखले वाटपाचे नियोजन करताना या प्रणालीवर १२ अतिरिक्त लोकांची नेमणुक करुन प्रक्रिया २४ तास चालू ठेवत गतिशीपणे दाखले वितरित करण्याचा प्रयत्न केला आहे.
हवेली तालुक्यात जून व जुलै महिन्यात तालुक्यातील शहरी व ग्रामीण भाग मिळून सेतू अथवा नागरी सेवा केंद्रातून ऑनलाइन जमा केलेली प्रकरणे तहसील कार्यालयात लिपीक, नायब तहसीलदार यांच्याकडून डिजीटल हस्तांतरात वितरीत करण्यात आले आहे.
दोन महिन्यांतील ६५ हजार दाखल्यांमध्ये सुमारे ३७ हजार ३१५ उत्पन्नाचे दाखले, डोमिसाईलचे १५ हजार २८६ दाखले, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्लूएस) चे ८ हजार १३१ दाखले वितरीत झाले आहे. ७३९ जातीचे दाखले व नौन क्रिमिलेअरचे ४ हजार ४३७ दाखले उपविभागीय महसूल अधिकारी संजय आसवले यांच्या मार्फत वितरीत करण्यात आले आहे.
महसूल सप्ताहात मोठी प्रशासकीय सेवा
हवेली तालुक्यात महसूल सप्ताहाअंतर्गत तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. दाखल्यांसाठी मार्गदर्शन तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे.
तालुक्यातील घेरा सिंहगड ग्रामपंचायतीच्या हद्दीत कातकरी अदिवासी पाड्यात प्रथमच तहसीलदार किरण सुरवसे हे समाजबांधवांना भेटून त्यांनी पाड्यावरील २५७ नागरीकांना जागीच जातीचे दाखले वितरीत केले आहे. त्यामुळे या कातकरी आदीवासी नागरीकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न ही कौतुकास्पद आहे.