शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता पीएम किसान योजनेत मोठा बदल, जाणून घ्या..

पुणे : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना डिसेंबर २०१८ मध्ये सुरु केली. या योजनेचा प्रत्येक वर्षी कोट्यवधी शेतकरी लाभ घेतात. जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
या योजनेत एक महत्त्वाचा बदल होणार आहे. प्रत्येक वर्षी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० रुपये जमा केले जातात. २००० हजार रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते.
परंतु आता या योजनेत एक हप्ता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर असे झाले तर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ८००० रुपये जमा होतील. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात याविषयी चर्चा सुरु होती. सरकार फेब्रुवारी २०२३ पासून जादा हप्त्याची तरतूद करू शकते, असा दावा केला जात होता.
दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पात याविषयी घोषणा केली जाणार होती. लवकरच लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या योजनेत बदल होऊ शकतात.