आता पुणे ते औरंगाबाद अवघ्या दोन तासात नितीन गडकरींची मोठी घोषणा…!

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आतापर्यंत देशात अनेक अशा नव्या योजना राबवल्या ज्या मार्गानं खऱ्या अर्थानं नवनवीन तंत्रज्ञान देशातील नागरिकांना अनुभवता आलं आहे . नितीन गडकरी यांनी गेल्या काही वर्षात रस्त्यांच्या वाहतूक क्षेत्रात जे कार्य केले आहे. त्याने भारत खरंच प्रगतीपथावर आहे याची प्रचिती येते.
गडकरींच्या कामाचे कौतुक त्यांच्या विरोधी पक्षातील लोक देखील करतात. आता त्यात भरम्हणून त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पुणे ते औरंगाबाद या शहरातील अंतर आता दोन तासांत पार करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
येत्या वर्षभरात मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवे पूर्ण होईल त्यानंतर पुणे- औरंगाबाद प्रवासही जलद करण्यात येणार आहे. नितीन गडकरी यांच्या हस्ते सातारा-सांगली जिल्ह्यातील 2300 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमीपूजनाच्या वेळी ते बोलत होते. साताऱ्यात उंडवडी कडेपठार ते फलटण या 33.65 किमी लांबीच्या चौपदरीकरणाची पायाभरणी तर, सांगलीत त्यांनी सांगली ते पेठ नाका या 40 किमी लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमीपूजन यावेळी गडकरींच्या हस्ते करण्यात आले.
औरंगाबाद ते पुणे दरम्यान सुमारे 225 किमी अंतराचा हा प्रवेश नियंत्रित एक्स्प्रेस वे बांधला जाणार आहे. हा रस्ता तयार झाल्यावर अवघ्या दोन तासात औरंगाबाद ते पुणे प्रवास शक्य होईल, असं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे.