हिंगोलीत मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात; 150 मेंढ्यांसह 5 जणांचा जागीच मृत्यू


मुंबई :  हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर शंभर ते दीडशे मेंढ्यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मिळलेल्या माहिती नुसार, कळमनुरीजवळ असलेल्या माळेगाव फाटा येथे मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे. सकाळच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. पोलिसांना स्थानिकांच्या मदतीने जखमी नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

यावेळी पाच जणांचा डॉक्टारांनी मृत घोषितअसून सध्या जखमी झालेल्या मेंढ्यांवर पशुवैद्यकीय रुग्णालयामार्फत उपचार करण्यात येत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!