‘उरुळीकांचन’ ला बेधुंद पिकअप चालक चौघांना उडवून फरार ! एका जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी … मृत्यू


उरुळी कांचन  : पुणे- सोलापूर महामार्गावर वाहनाची वाट पाहत बसलेल्या चौघांना एका भरधाव पिकअप चालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. 02) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौकात हा अपघात झाला. या अपघातातील मयत व जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

प्रत्यदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या दिशेने जाण्यासाठी चौघेजण तळवडी चौकात वाहनाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे होते. याच दरम्यान सोलापूर च्या दिशेने एक पिकअप वाहन निघाले होते.

यावेळी चौकात उभे राहिलेल्या चौघांना पिकअप चालकाने जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की एकाचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित तिघांना गंभीर दुखापत झाली. जखमींना लाईफ केयर रुग्णवाहिकेतून सिद्धिविनायक हॉस्पिटल हा ठिकानी पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघातात पिकअप चालक हा सोलापूरच्या बाजूने न थांबता पळून गेला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अक्षय बंटी कांचन ओंकार रानवडे, तुषार पांगारे, प्रथमेश जगताप, आर्यन जगताप आदींनी तातडीने घटनास्थळी पोहोचले व तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. उरुळी कांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!