महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला ; पुढील आणखी काही दिवस बसणार उन्हाचे चटके…!

पुणे : संपूर्ण भारतात हिवाळा सध्या अंतिम टप्प्यात आहे. मुंबईत, मात्र उन्हाळ्याने ऋतू संपण्याआधीच हजेरी लावल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मुख्यतः महाराष्ट्राने 2023 चा आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस पाहिला आहे.
दरम्यान काल महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा किनारपट्टीवर अनेक भागांमध्ये कमाल तापमान 37-39°C च्या तापमानची नोंद करण्यात आली. दरम्यान हवामान खात्याने पुढील 48 तासांसाठी अतिउष्णतेचा इशारा दिलाय. पुढील दोन दिवसात कोकण किनारपट्टी आणि कच्छमध्ये उष्णतेची लाट येणार आहे. या काळात तापमान 37 ते 39 अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.
भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीला 48 तासांसाठी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. यलो अलर्ट असलेल्या या भागात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे, राज्यात तापमानात झालेल्या कमालीच्या वाढीमुळे गव्हाच्या पिकाला देखील फटका बसण्याची शक्यता आहे.उष्णतेच्या लाटेचा जास्त प्रभाव असणार आहे. भारतीय हवामान विभागाने सोमवारी मुंबई, रायगड रत्नागिरी या जिलह्यांसाठी इशारा दिला आहे.