टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या! किलोचा अडीच रुपये भाव, शेती नेमकी करायची कशी?


पुणे :  सध्या बाजारात आवक वाढल्याने टोमॅटोचा बाजार भाव घसरला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. टोमॅटोला केवळ अडीच रुपये किलो दर मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे शेती नेमकी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार आवारात सध्या टोमॅटोला प्रतवारीनुसार टोमॅटोला प्रति वीस किलोच्या क्रेटला फक्त 50 रुपये ते 140 रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच प्रति किलो अडीच रुपये ते सात रुपये इतका कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. मागील तीन महिन्यापासून टोमॅटोच्या बाजारभावात सतत घसरण सुरू आहे.

त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यांचा टोमॅटो तोडणी व वाहतूक खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे टोमॅटो पिकासाठी शेतकर्‍यांनी केलेला भांडवली खर्च शेतकर्‍यांच्या अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे.

यामुळे शेतकरी पीक सोडून देत असून तोडणी सुद्धा परवडत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यात टोमॅटोचा दर वधारले होते. शेतकऱ्यांना शेतात सीसीटीव्ही लावावे लागले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना लाखोचा फायदा झाला होता.सध्या मात्र परिस्थिती वेगळी आहे.

यंदा जानेवारी महिन्यापासून अद्याप टोमॅटोला चांगला भाव मिळालेला नाही. टोमॅटोची लाली कमी झाली आहे. अनेकांना अजून मुबलक प्रमाणात पाणी असल्याने टोमॅटोची लागवड केली आहे. यामुळे आवक जास्त प्रमाणावर होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!