राज्यात ‘या’ लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी मिळणार ५०० रुपये, महत्वाची माहिती आली समोर…


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

या योजनेत एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पूर्ण रक्कम म्हणजेच १५०० रुपये मिळणार नाहीत, तर फक्त ५०० रुपये मिळवू शकतील.

राज्य सरकारने २०२३ मध्ये केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो महासन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षभरात तीन टप्प्यांमध्ये ६,००० रुपये दिले जातात.

दरम्यान, याशिवाय केंद्र सरकारकडूनही महिलांना किसान सन्मान योजनेतून ६,००० रुपये मिळतात. म्हणजेच एकूण १२,००० रुपये सरकारी मदत म्हणून त्या महिलांच्या खात्यात जमा होते.

मात्र लाडकी बहीण योजनेच्या अटींनुसार, एका सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला दुसऱ्या योजनेचा संपूर्ण लाभ घेता येत नाही. त्यामुळे नमो शेतकरी योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतील हप्ता कमी करून फक्त उर्वरित सहा हजार रुपयांचा लाभ म्हणजे महिन्याला फक्त ५०० रुपये दिले जाणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!