Shirur : शिरुर-हवेली विधानसभेला हवेलीची मतदार संख्या पंच्चेचाळीस ते पन्नास हजारांनी वाढणार! प्रदिप कंद, माऊली कटकेंच्या तयारीकडे तालुक्याच्या नजरा…!!


जयदीप जाधव

Shirur उरुळीकांचन : राज्यातील विधानसभा ऑक्टोबर महिन्यात विसर्जित होत आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. या विधानसभेच्या निवडणूकीची अचारसंहिता जाहीर होण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तयारीला इच्छुकांनी सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून २० ऑगस्टपर्यंत प्रारुप मतदारयादी तयार करण्याची लगबग सुरू आहे.

त्यानुसार मतदारनाव नोंदणीची मोहिम अंतिम टप्प्यात आहे. अशातच शिरुर-हवेली मतदारसंघात मतदार नावनोंदणीत प्रक्रियेत यंदा हवेली तालुक्यातील मतदारसंख्या शिरुर तालुक्या पेक्षा साधारण चाळीस ते पंच्चेचाळीस हजारांच्या पुढे जाणार असल्याने मतदारसंख्येच्या आकडेवारीवरुन हवेलीला संधी मिळणार का म्हणून तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

शिरुर -हवेली विधानसभा मतदारसंघात ही शेवटची विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीनंतर मतदारसंघ नव्याने पुनर्रचित होणार आहे. हा मतदारसंघ २००९ ची निर्मिती नंतर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हवेली तालुक्याला अद्याप मिळाले नसून या मतदारसंघातून संधी मिळण्याचा शोधात हवेली कर आहेत.यानिवडणुकीत मात्र शिरुर इतकेच हवेली तालुक्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाल्याने लोकसभा निवडणूकी नंतर विधानसभेच्या निवडणूकीला तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

शिरुर-हवेली मतदारसंघात गत लोकसभा निवडणुकीत ४ लाख ३९ हजार २७६ इतकी मतदान संख्या होती. आता मात्र विधानसभा निवडणुकीत ही मतदानसंख्या पावणेपाच लाखांच्या घरात पोहचणार असून हवेली तालुक्यात साधारण अडीच लाख तर शिरुर तालुक्यातील दोन लाखांच्या आसपास मतदान संख्या यादीत सामाविष्ठ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हवेलीत यंदा हा आकडा चाळीस ते पंचेचाळीस हजारांच्या अधिक असणार आहे. Shirur

त्यामुळे या निवडणुकीची गणिते साहजिकच बदलणार आहेत. हवेली तालुक्याच्या पूर्व भागाला विधानसभेची संधी अद्याप मिळाली नाही. तालुका एकसंध नसल्याने तालुक्याच्या मूळ समस्येकडे लक्ष देण्यात जिल्ह्याच्या राजकारणात निरउत्साह आहे. त्यामुळे हवेली तालुक्याच्या राजकारणात एकमुखी नेतृत्व मिळत नसल्याने नेतृत्वाची पोकळी अनेकवर्षाची आहे. तालुका एकसंध नसल्याने उसणेवार नेतृत्वाच्या संधीत तालुक्याला प्रश्न सोडविण्याची धन्यता मानावी लागत आहे. त्यामुळे तालुक्याचे प्रश्न उसणेवार नेतृत्वाच्या भरोश्यावर अवलंबून असल्याने प्रश्न सुटत नसल्याची तालुक्याची स्थिती आहे. सहकारात तालुका
नेतृत्व नसल्याने होरपळून निघाला आहे.

हवेली तालुक्यात नागरीकरण वाढत असल्याने महापालिका धर्तीवर विकासाचा अनुशेष भरून काढावा लागणार आहे.विकास आराखड्याची सद्यस्थितीनुसार अंमलबजावणी ,महसूल, पोलिस विभागाच्या सामावेशातील त्रुटी, रेल्वेची मिळत नसलेली सुविधा, पीएमपीएमएलची सुविधांचा अभाव आहे.वीजेचा प्रश्नाचा निवाडा होणे गरजेचे आहे. त्यामुळे हे प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्याला संधी मिळणार का , म्हणून उत्सुकता आहे.

शिरुर-हवेली विधानसभेसाठी तालुक्यातून जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद यांना समान संधी आहे. तर शिवसेना उबाठा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके हेपण तयारीत आहेत. त्यामुळे तालुक्याचे विधानसभेकडे डोळे लागले आहेत. तालुक्याला संधी मिळाली तरआमदारकीच्या माध्यमातून नेतृत्वचा अनेकवर्षाची पोकळी भरुन निघणार म्हणून निवडणुकीचे तर्कांना सुरुवात झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!