Sharad Pawar : १४१ खासदारांचे निलंबन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…


(Sharad Pawar) : लोकसभेच्या खासदारांच्या निलंबनाचे सत्र अजूनही सुरु असल्याचं दिसत आहे. यावरुन दोन्ही सभागृहांमध्ये सुरु असलेल्या गदारोळामुळे खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आज एकूण ४९ खासदारांचे निलंबन करण्यात आले असून यामध्ये सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे.

यासह निलंबित खासदारांची संख्या १४१ वर पोहोचली आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संतापले आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “सभागृहात सुरु असल्येल्या गंभीर गोष्टी याआधी झालेल्या नाहीत. विरोधकांनी फक्त हे लोक कोण होते, यामध्ये कोणाचा हात आहे.

याची माहिती गृहमंत्र्यांनी द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र ती माहिती सभागृहात न देण्याची भूमिता घेतली गेली. याविषयी सभागृहाच्या बाहेर बोलले जात आहे, मात्र ज्याठिकाणी हा प्रकार घडला त्या ठिकाणी ही माहिती देणार नाही अशा प्रकारचं वर्तन सत्ताधारी पक्षाचं आहे.

मात्र यात बदल करावा आणि माहिती द्यावी अशी मागणी केली आणि त्यामुळेच खासदारांनी बडतर्फ केलं. अशा कारणांसाठी अशी कारवाई याआधी झालेली नाही,” अशी जोरदार टीका शरद पवारांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!