Rupali Chakankar : ‘सुप्रियाताई १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या, आता ते सोबत नाहीत तर…’, रुपाली चाकणकरांची टीका


Rupali Chakankar : आगामी लोकसभा निवडणूकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होताना होत आहेत. अशातच अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया ताई गेले १५ वर्ष अजितदादांमुळेच निवडून आले आहेत, अशी खोचक टीका केली आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, दादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळे निवडून आले आहेत. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाले आहेत. दादा सोबत नाही म्हणून तळ ठोकावा लागत आहे. सुप्रीया सुळे गेली १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल.

अजितदादांनी जो निर्णय घेतला तो विकासासाठी घेतला. अजित दादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हाला काम करावं लागेल. आमचं स्वप्न आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, दादा मुख्यमंत्री व्हावं हे सर्वांची इच्छा आहे. असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. तसेच आगामी निवडणूकीत महायुतीचा विजय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. Rupali Chakankar

पुढे म्हणाले, दादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळेच निवडून आले आहेत. विकासाचे राजकारण हवं आहे. सुप्रिया ताई गेले १५ वर्ष अजितदादांमुळेच निवडून आल्या आहेत. दादासोबत नाहीत म्हणून तळ ठोकावा लागतोय., अशी टीका त्यांनी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!