पुरंदर विमानतळाबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना महत्वाचं आश्वासन, म्हणाले, काळजी करू नका, तुमचे भूसंपादन…

पुरंदर : येथील वनपुरी, एखतपूर, कुंभारवळण, उदाची वाडी, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावांमध्ये विमानतळ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आता राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. त्यानंतर प्रत्यक्षात भूसंपादन प्रक्रिया करण्यापूर्वी संयुक्त मोजणी, ड्रोनद्वारे सर्वेक्षणाची प्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.
याबाबत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यात येईल, अशा शब्दांत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सात गावांतील शेतकरी, जमीन मालकांच्या शिष्टमंडळांना आश्वासन दिले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचा विरोध कमी होणार का हे येणाऱ्या काळात समजेल. शेतकऱ्यांची बाजू ऐकून न घेता सरकारने विमानतळ उभारण्याचे धोरण तयार केले आहे.
त्यामुळे सात गावांतील स्थानिक शेतकऱ्यांनी विमानतळास जमीन देण्यास विरोध दर्शविला आहे. याबाबत शेतकरी आक्रमक झाले आहेत. याबाबत आता जिल्हा प्रशासनाकडून सरकारच्या बाजूने शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे. याबाबत प्रक्रिया करण्यात येत असल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
सरकारची भूमिका समजावून सांगण्यात येत आहे. असे असताना शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी सासवड येथे उपोषण सुरू केले होते. याबाबत पुरंदरच्या तहसीलदार वर्षा लांडगे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांची बाजू सरकारकडे मांडण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. यामुळे शेतकरी येणाऱ्या काळात काय भूमिका घेणार हे लवकरच समजेल.
शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊनच भूसंपादन केले जाणार आहे. पुढील १०० वर्षांच्या विकासाचे दृष्टिकोन म्हणून हा विमानतळ करावा लागणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. त्यांनी या गावात विमानतळ होणार होणार असल्याचे देखील सांगितले.