दहशतवाद्यांच्या पायाखालची जमीन काढून घेऊन त्यांना मातीत गाठणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकला इशारा…


नवी दिल्ली : मी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतो की ज्यांनी हा हल्ला केलाय त्या दहशतवाद्यांना आणि या हल्ल्याचा कट आखणाऱ्यांना, त्यांनी कल्पनाही केली नसेल इतकी मोठी शिक्षा मिळेल, असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना दिला आहे.

बिहारमधील मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त गुरूवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भाषणाच्या आधी मोदी यांनी मौन बाळगून पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात दहशतवाद्यांवर निशाणा साधला. आता उरल्यासुरल्या दहशतवाद्यांनाही मातीत गाडायची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

पहलगाम येथील बैसरण येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्वजनिकरित्या या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. या हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला होता.

मोदी म्हणाले, देशाच्या शत्रुंनी केवळ केवळ निष्पाप पर्यटकांवर नव्हे, तर भारताच्या आत्म्यावरच हल्ला करण्याचे धाडस केले आहे. दहशतवाद्यांच्या हाती उरलेली थोडीफार जमीनसुद्धा आता हिरावून घेण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, आज बिहारच्या भूमीवरून मी संपूर्ण जगाला सांगतो की भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांची ओळख पटवेल, त्यांना शोधून काढेल आणि शिक्षा देईल.आपण त्यांचा पृथ्वीच्या टोकापर्यंत पाठलाग करू.आपण त्यांचा शेवटपर्यंत पाठलाग करू. दहशतवादामुळे भारतीयत्वाचे स्पिरीट कधीही कमी होणार नाही. दहशतवादाला माफ केले जाणार नाही.

या दहशतवादी हल्ल्यात कोणी मुलगा, कोणी भाऊ तर कोणी जीवनसाथी गमावलाय. त्यांच्यापैकी कोणी बंगाली बोलायचं, कोणी कानडी बोलायचं, कोणी मराठी होतं, कोणी गुजराती होतं तर कोणी बिहारी होतं. आज या सर्वांच्या मृत्यूमुळे कारगील ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दुःख, आक्रोश एकसारखाच आहे. हा केवळ निरागस पर्यटकांवर नव्हे तर देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचं धाडस केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!