मोठी बातमी! दोन दिवसात पाकड्यांनी गुडघे टेकले, विदेशमंत्री इशाक डार यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा..


नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. ७ मे रोजी भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकवर मोठा हवाई हल्ला करण्यात आला आहे.

जम्मू-श्रीनगर ते पठाणकोट आणि पोखरणपर्यंत पाकिस्तानचे ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून भारताने १४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद केली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील वाढत्या वादावर चिंता व्यक्त केली आहे.

भारत पाकिस्‍तान युद्धविरामाची घोषणा झाल्‍यानंतर भारत व पाकिस्‍तानकडून गोळीबारी व अन्य सैनिकी कारवाया रोखण्यासाठी सहमती दर्शवली आहे. अशी माहिती परराष्‍ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे. भारत आता कोणत्‍याही प्रकारच्या दहशतवादी हल्‍ल्‍याविरोधात कायमच कठोर भूमिका घेईल अशीही स्‍पष्‍टोक्‍ती त्‍यांनी दिली.

पाकिस्‍तानचे विदेशमंत्री इशाक डार यांनी पाकिस्‍तानकडून युद्धविरामाची घोषणा केली आहे. तत्‍काळ प्रभावानंतर भारत आणि पाकिस्‍तानने युद्धविरामाची तयारी केली आहे. तसेच दोन्ही क्षेत्रांमध्ये शांती प्रस्‍थापित व्हावी यासाठी प्रयत्‍न सरु आहेत. असेही डार यांनी म्‍हटले आहे.

भारत पाकिस्‍तान युध्दविरामासाठी तयार : डोनाल्‍ड ट्रम्‍प यांचा दावा

भारत आणि पाकिस्‍तान हे युद्धविराम करण्यासाठी तयार आहेत. असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी केला आहे. त्‍यांसदर्भात त्‍यांनी ट्विट केले आहे.

बीएसएफचे 8 जवान जखमी

पाकिस्तानने केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात जम्मू-काश्मिरमधील आरएस पुरा येथे बीएसएफचे 8 जवान जखमी झाले आहेत.

गुजरातमध्ये किनारी सुरक्षा व्यवस्थेत वाढ

भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढल्यानंतर गुजरात पोलिसांनी राज्याच्या समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा वाढवली; दक्षिण गुजरातमध्ये कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

सूरत रेंजचे आयजी प्रेमवीर सिंग यांनी सांगितले की, “दक्षिण गुजरातमधील समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. पोलिस संवेदनशील भागांमध्ये गस्त घालत आहेत. कोणतीही आव्हाने पेलण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत.”

पंतप्रधान मोदींचा इशारा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत महत्वाची बैठक घेतली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांसह सीडीएस आणि तीन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी एक महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

त्यानुसार यापुढे भारतातील कोणतीही पाकपुरस्कृत दहशतवादाची कारवाई हे युद्धच समजले जाईल, असा इशाारा पंतप्रधान मोदींनी दिल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.

भारतात 23 कोटींहून अधिक मुस्लीम हे पाकिस्तानने विसरू नये- असदुद्दीन ओवैसी

हैदराबाद (तेलंगणा): AIMIMचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “भारतामध्ये 23 कोटीहून अधिक मुस्लिम राहतात आणि आमच्या पूर्वजांनी मोहम्मद अली जिना यांचा द्विराष्ट्र सिद्धांत नाकारला होता. आम्ही भारताला आपलं राष्ट्र मानलं आहे आणि याठिकाणीच राहणार आहोत.

ओवैसी पुढे म्हणाले, “पाकिस्तान भारताला धर्माच्या आधारावर फोडू इच्छितो. तो हिंदू, मुस्लिम आणि इतर समुदायांमध्ये तेढ निर्माण करत आहे.

जर पाकिस्तान द्विराष्ट्र सिद्धांत मानतो, तर मग ते अफगाणिस्तान व इराणच्या सीमांवर बॉम्बहल्ले का करत आहेत? अफगाणी आणि इराणीही मुस्लिम आहेत. यावरून स्पष्ट होते की, पाकिस्तानची ‘डीप स्टेट’ बेकायदेशीर कृत्यं आणि दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी इस्लामचा केवळ मुखवटा म्हणून वापर करत आहे.ओवैसी यांनी आरोप केला की,”गेल्या ७५ वर्षांपासून पाकिस्तान भारताविरोधात हाच अजेंडा राबवत आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!