पाकिस्तानी लष्कर घाबरले! हजारो सैनिक आणि अधिकाऱ्यांनी दिले धडाधड राजीनामे, नेमकं काय घडलं?

पहलगाम : काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे सध्या दोन्ही देशामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
पाकिस्तानी लष्करात भूकंप माजवणारी एक बातमी समोर आली आहे. सध्या पाकिस्तानी सैन्यदलात अधिकारी आणि सैनिक मोठ्या प्रमाणावर राजीनामे देत आहेत. सगळ्यांना पाकिस्तानी लष्करातील नोकरी तातडीने सोडायची असल्याची बाब समोर आली आहे. एकूण 250 अधिकारी 1200 सैनिकांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याची माहिती आहे.
पाकिस्तानकडून सीमारेषेवर सैन्याची जमवाजमव सुरु झाली होती. परिणामी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल, अशी जोरदार चर्चा आहे. असे असताना पाकिस्तानमधून अनेक सैनिक राजीनामे देत असल्याचे समोर आले आहे. यामुळे युद्धाला पाकिस्तान भीत असल्याचे समोर आले आहे.
सध्या पाकिस्तानी सैन्यदलात अधिकारी आणि सैनिक मोठ्याप्रमाणावर राजीनामे देत आहेत. पाकिस्तानच्या 11व्या कोअरचे प्रमुख ओमर अहमद बोकारी यांनी लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 12 क्वेटा कोअर, फर्स्ट कॉर्प मांगला रिजन, नॉर्दन कमांडमधील अनेक अधिकारी आणि सैनिकांनी राजीनामे दिले आहेत.
तसेच 50 अधिकारी आणि 500 सैनिकांनी लष्करी सेवेतून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कामाचा वाढलेला तणाव आणि भारतासोबत निर्माण झालेल्या तणावजन्य परिस्थितीबाबत सरकारकडे नसलेले ठोस धोरण या बाबींचा उल्लेख आपल्या राजीनामा पत्रात केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाने युद्धाच्या परिस्थितीत कोणत्याही अधिकाऱ्याने अथवा सैनिकाने राजीनामा देऊ नये, अशी तंबी देऊन ही पडझड तुर्तास थांबवल्याचे सांगितले जात आहे. या परिस्थितीवर तोडगा काढावा, अशी मागणी लष्करप्रमुखांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी काय करणार हे लवकरच समजेल.