भारत-पाक युद्ध सुरू!!, युद्ध वाढल्यास ‘या’ वस्तूंच्या किंमती भडकणार, जाणून घ्या..


नवी दिल्ली : सध्या भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केला. असे असताना पाकिस्तानने काल रात्री भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या सर्तक असलेल्या सैन्यदलांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला. यामुळे मोठी घटना टळली आहे.

तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव जर प्रत्यक्ष युद्धात परिवर्तित झाला, तर त्याचे सर्वात गंभीर परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर होतील. विशेषतः कृषी क्षेत्र हे युद्धाच्या झळा सहन करणाऱ्या पहिल्या क्षेत्रांपैकी एक आहे.

युद्धामुळे निर्माण होणाऱ्या अस्थिरतेमुळे अनेक वस्तूंच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. भारताचे पंजाब, राजस्थान, जम्मू-कश्मीर आणि हरियाणा ही सीमावर्ती राज्ये महत्त्वाची अन्नधान्य उत्पादक राज्ये आहेत.

युद्धजन्य स्थितीमुळे या भागांतील शेती, पाणीपुरवठा, बियाणे वितरण, ट्रॅक्टरसारखी शेती यंत्रणा आणि शेतमजूरांची उपलब्धता यांवर परिणाम होतो. परिणामी गहू, तांदूळ, डाळी, साखर यांसारख्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात.

युद्धामुळे महामार्ग व रेल्वे वाहतुकीत अडथळा येतो. त्यामुळे भाज्या, फळे, कांदा, बटाटा, टोमॅटो यांचा वेळेवर पुरवठा होऊ शकत नाही. परिणामी महानगरांमध्ये यांची टंचाई निर्माण होऊन भाव दुपटीने वाढू शकतात. यामुळे शहरी भागातील उपभोक्त्यांवर ताण येतो.

कृषी उत्पादनासाठी आवश्यक असलेली यंत्रे, खते, औषधे आणि बियाणे ही बऱ्याच प्रमाणात बाहेरून (देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय) येतात. युद्धामुळे या वस्तूंच्या उत्पादन, वाहतूक आणि वितरण साखळीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे किंवा खत उपलब्ध न झाल्यास शेतीचे नुकसान होते आणि पुढील हंगामात उत्पादनात घट होऊन महागाई वाढते.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी, वाहतुकीसाठी, यंत्रसामग्री चालवण्यासाठी डिझेलची गरज असते. युद्धामुळे इंधन महाग झाल्यास कृषी उत्पादन खर्चात मोठी वाढ होते. परिणामी उत्पादन खर्चाच्या तुलनेत नफा घटतो, आणि शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!