भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आणि सोन्याच्या दरात झाली मोठी वाढ, ऐन लग्नसराईत सोनं 1,20,000 पर्यंत जाणार?

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ सुरु आहे. भारताने ७ मे रोजी पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करुन धडा शिकवला तसेच अनेक निर्बंध घातले आहेत. बुधवारी भारतीय सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात मोठ नुकसान झालं आहे. असे असताना पाकिस्तानच्या शेअर मार्केटमध्ये मंदीची स्थिती आली आहे.
याचा परिणाम जागतिक मार्केटवरही झाला आहे. सोनं मागच्या काही दिवसांपासून घसरत होतं मात्र या घसरणीला ब्रेक लागला असून पुन्हा 1000 रुपयांनी दर वाढले आहेत. तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमती पुन्हा एकदा एक लाख रुपयांच्या पार पोहोचल्या आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीही सोने एक लाख रुपयांच्या पुढे गेले होते. जागतिक अनिश्चिततेमुळे सोने गुंतवणूकदारांची पहिली पसंद बनले आहे आणि लोक त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. यामुळे याचे मोठे परिणाम बाजारावर दिसून येत आहेत. सोन्याचे दर येत्या काळात 1 लाख 20 हजारपर्यंत वर्षांच्या शेवटी जाण्याची शक्यता आहे.
सध्या दिल्लीमध्ये बुधवारी सोने एक हजार रुपयांनी महागले आणि प्रति 10 ग्रॅम एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा मंगळवारचा बंद भाव 99,750 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो एका दिवसात एक हजार रुपयांनी वाढून 1,00,770 रुपये झाला. यामुळे दर वाढल्याचे दिसून आले आहे.
आज सकाळी हेच दर GST सह 1,01,110 रुपये झाला. दर सोन्याचे दर 99,750 रुपये प्रति 10 ग्रॅम प्रति तोळा झाला आहे. 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात आज आणि काल 1,050 रुपयांची वाढ झाली. प्रति 10 ग्रॅम 1,00,350 रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी 22 एप्रिल रोजी सोन्याच्या दरात 1800 रुपयांची मोठी वाढ झाली होती.
असे असताना ग्राहकांनी सध्या चढत्या दरात गुंतवणूक करू नये थोडं थांबाव असं तज्ज्ञांचा सल्ला आहे. त्यामुळे ग्राहकांनी सोनं विकू नये किंवा सध्या खरेदी देखील करू नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. यामुळे येणाऱ्या काळात दर कसे राहणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.