पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पुण्यातून जाणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्या रद्द, जाणून घ्या…


पुणे : सध्या पुण्यातून जम्मूकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. जम्मू तवी एक्सप्रेस ही गाडी सध्या पुण्याहून निघून फक्त दिल्लीपर्यंतच जाईल. ती सध्या जम्मूपर्यंत जाणार नाही.अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

तसेच जोधपूरहून पुण्याला येणारी जोधपूर-पुणे (हडपसर) एक्सप्रेस ही गाडी आज आणि उद्या पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. या गाड्या सध्या सुरक्षेच्या कारणामुळे थांबवण्यात आल्या आहेत. सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे बदल १३ मे २०२५ पर्यंत लागू राहतील.

त्यामुळे शेतकरी किंवा अन्य प्रवासी जर पुण्याहून उत्तर भारतात जम्मू, पंजाब, हरियाणा, दिल्ली या भागात जाणार असतील, तर त्यांनी आधीच रेल्वेचे नवीन वेळापत्रक तपासून घ्यावे. गाडी रद्द झाली असेल किंवा फक्त अर्ध्या मार्गापर्यंतच चालणार असेल तर प्रवासात अडचण येऊ शकते, असे रेल्वेकडून सांगितले आहे.

दरम्यान, सध्या भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी एक मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यात २७ लोक मारले गेले, यामुळे दोन्ही देशात वातावरण तापले आहे.

काश्मीरमधील घटनेत २६ भारतीय नागरिक आणि १ नेपाळी व्यक्ती होती. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आणि केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलायला सुरुवात केली. यामुळे आता हल्ले सुरू आहेत. यामुळे याबाबत निर्णय घेतले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!