पुरंदर विमानतळासंदर्भात महत्वाची माहिती समोर, सर्वेक्षण थांबवले, शेतकऱ्यांना मोठी ऑफर..


पुणे : पुरंदर विमानतळ प्रकल्पासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला तणाव लक्षात घेता, राज्य सरकारने मोठा निर्णय घेत सर्वेक्षण तात्पुरते थांबवले आहे.

या प्रकल्पास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आमंत्रण देत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, सरकार कोणताही अन्याय करणार नाही, मात्र प्रकल्प राबवण्याची भूमिका बदलणार नाही.

बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मुळावर उठून काहीही होणार नाही. आम्ही त्यांना ऑफर देऊ, त्यांनीही ऑफर द्यावी. चर्चा टेबलावर होईल आणि तिढा सुटेल. त्यांनी स्पष्ट केले की, पुरंदर विमानतळ हा पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा माल निर्यात करता येणार आहे. सात गावांतील नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन आम्ही सर्वेक्षण थांबवले आहे आणि पुढील १५ दिवसांत पुन्हा संवाद साधण्यात येईल.

शेतकऱ्यांना उद्देशून बावनकुळे म्हणाले की, तुम्हाला जमीन द्यायची नसेल तरी सरकारला ती हवी आहे. तुमच्या मागण्या आम्हाला सात दिवसांत कळवा.” त्यांनी सांगितले की, सरकार अशा प्रकारची योजना आणेल की शेतकऱ्यांना भरपूर लाभ होईल आणि त्यांना ‘सरकारने चांगले दिले असे वाटेल. भूसंपादनाच्या विरोधात असलेल्या लोकांशी चर्चा सुरू असून, गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांविषयीही फेरविचार केला जाईल.

दरम्यान, घटनेनंतर पोलिस व ग्रामस्थांमध्ये झालेली झटापट आणि गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांचा वेगळा विचार करण्याचे आश्वासन दिले आहे जे निष्पाप आहेत. “सरकार शेतीच्या हक्कासाठीही सज्ज आहे, पण विमानतळाचा प्रकल्प महाराष्ट्राच्या भविष्यासाठी गरजेचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!