शेतकऱ्यांनो काळजी घ्या! महाराष्ट्रावर येत्या 48 तासात मोठं संकट, हवामान खात्याकडून अलर्ट…


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. आता हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी यासोबतच पुढील दोन दिवस पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्येही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी नुसता मुसळधार पाऊस कोसळणार नाही तर ५० ते ६० किमी वेगानं वारं वाहण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट येणार असून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील ४८ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

यामध्ये वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यासोबतच अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने राज्यातील नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस बरसणार आहे.

यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ४ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिट, तर ९ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना इथे पावसाच्या हलक्या सरी बरसतील, असेही सांगितले आहे. मुंबई ते रायगड, कोकण पट्ट्यात दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे.

तर दुसरीकडे गारपिट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!