चौफुल्यावर घडला टाळ व चाळ मिलाफ! वारकऱ्यांना नृत्यांगणांच्या ठेक्यांनी केले मंत्रमुग्ध..!!


यवत : जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पहिला मुक्काम आटोपून यवतहून वरखंडच्या दिशेने पंढरपुरकडे रवाना झाला.

जगत गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या मनोरंजन व्हावे म्हणून लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गुरुवारी यवत मधील मुक्काम आटोपून वारकऱ्यांना वाटेत आलेला थकवा कमी करण्यासाठी वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रच्या वतीने लावणी आणि अभांग यांचे सादरीकरण करण्यात आले.

गेली ३० वर्षाहून अधिक काळ ही परंपरा कला केंद्र ने जपली असून १० हजार वारकऱ्यांना या ठिकाणी जेवण देखील दिले जात असल्याची माहिती कला केंद्राचे संचालक अशोक जाधव आणि जयश्री जाधव यांनी दिली.

यावेळी जवळपास एक तास लावण्या आणि अभांग यां जुगलबंदी वारकऱ्यांना अनुभवता आली दरवर्षी पालख्या विठ्ठल च्या भेटीला निघाल्यानंतर पाऊस पडण्यास सुरुवात होते.

परंतु यावर्षी अद्याप पर्यंत पाऊस झाला नाही म्हणून आम्ही विठ्ठल च्या चरणी प्रार्थना करतो की यावर्षी देखील पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणावी अशी भावना लावणी कलावंत प्रिया नगरकर यांनी व्यक्त केली. वारकऱ्यांच्या मनोरंजन करण्यासाठी वैशाली वाफळेकर, संगीता काळे, स्वाती साळुंखे, पायल जाधव यांसह अनेक नृत्यांगना उपस्थित होत्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!