पुण्यातील तीन पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत, ‘ते’ प्रकरण आले अंगलट..


पुणे : आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याप्रकरणी पुण्यात ती पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामुळे कामात तत्परता दाखवल्याने ही कारवाई केली आहे.

येरवडा कारागृहातून तीन आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पुन्हा येरवडा कारागृहात ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी त्यांना घेऊन जाते होते. यावेळी ही घटना घडली आहे.

असे असताना परस्पर त्यांनी आरोपीला खासगी रिक्षाने घेऊन निघाले असता तो आरोपी रिक्षातून पळाला. यामुळे ते आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस हवालदार मुरलीधर महादु कोकणे, पोलीस नाईक निलेश विनायक गुरव आणि राजूदास रामजी चव्हाण अशी निलंबीत करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयात आहे. येरवडा कारागृहातून आरोपींना घेऊन त्यांना सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला हजर करण्यास आले होते. कामकाज संपल्यावर त्यांना पुन्हा येरवडा कारागृहात आरोपींना जमा करण्यासाठी कर्तव्यावर तिघांची नेमणूक करण्यात आली होती.

त्यावेळी राजूदास चव्हाण यांनी राजेश कांबळे याला खासगी रिक्षाने घेऊन जाऊन येरवडा कारागृहात जमा करतो, असे सांगितले. त्याला इतर दोघांनी होकार दिला. त्याप्रमाणे चव्हाण कांबळे याला रिक्षाने घेऊन निघाले.

असे असताना कांबळेने तहान लागल्याचे सांगितल्याने वाटेत रिक्षा थांबविली. ते पाणी आणण्यास गेले असता कांबळे रिक्षातून उतरला आणि साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!